Indian Geography Congress : ४५ वी भारतीय भूगोल काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

तीन दिवसीय परिषदेत ६०० वर तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित राहणार 

Indian Geography Congress :  ४५ वी भारतीय भूगोल काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अमृत महोत्सवी वर्षानिमत्त ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे (Indian Geography Congress) आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण, विकास आणि शाश्वतता - संवेदनक्षम भविष्यासाठी भूगोलाची अत्यावश्यकता’ (Environment, Development and Sustainability - The Imperative of Geography for a Sensible Future)या विषयावर ही परिषद होणार आहे.गुरूवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात या परिषदेचे उद्धाटन होणार आहे.

हेही वाचा : देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ : सुमारे दोन कोटी विद्यार्थिनी घेत आहेत शिक्षण

विद्यापीठाच्या भुगोल विभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफ्रर्स इन इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने येत्या १४ ते १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे  उद्धाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून  फ्रांसमधील रियुनियन आयलँड या विद्यापीठातील भूगोल या विषयाचे प्रा. डॉ. बीट्रिस मोपर्ट, श्रीलंकेमधील केलानिया विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रा. एल. एम. धरमसीरी, आंध्रा विद्यापीठातील भूगोल या विषयाच्या प्राध्यापिका डॉ. हेमा मालिनी, बिहारच्या मगध विद्यापीठातील प्रा. डॉ. राना प्रताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. सुधाकर परदेशी हे उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाच्या अध्यपदी केरळमधील सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजचे प्रा.श्रीकुमार चट्टोपाध्याय हे असतील. 

 २१ व्या शतकात विकास, पर्यावरण या बाबात विविध स्तरावर नवनविन आव्हने अनुभवास येत आहेत. याची तिव्रता कमी करून साधन संपत्तीचे संवर्धन, सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्यासाठी लागणाऱ्या विश्लेषणाची व उपाययोजनांमध्ये भूगोल या विषयाचे महत्त्व असाधारण आहे. त्यामुळे या परिषदेत स्थानिक ते जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या व विकासाच्या विषयांवर सखोल चर्चा होऊन भौगोलिक दृष्टिकोनातून उपाययोजना व यांची शाश्वतता या दृष्टिने चर्चेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियातील प्रतिनिधी सहभागी होणार असून येथील तज्ञ प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांचे मार्गदर्शन करणार आहेत. तर देशभरातील ६०० पेक्षा जास्त प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान आयोजक प्रा. रविंद्र जायभाय यांनी केले आहे.