पोलीस भरती 2023 : डाॅक्टर, इंजिनीअर, वकिलांना व्हायचंय पोलीस, ४१ टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज 

महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

पोलीस भरती 2023 : डाॅक्टर, इंजिनीअर, वकिलांना व्हायचंय पोलीस, ४१ टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police Force) 17 हजार 471 पदांसाठी भरती सुरु आहे. 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी बारावी पासची पात्रता असताना ४१ टक्के उमेदवार हे उच्च शिक्षित (41% candidates are highly educated) असल्याचे अर्ज छाननी प्रक्रेयतून समोर आले आहे. शिवाय डॉक्टर, इंजनिअर, वकिल, एमएस्सी, बी-टेक यांसारख्या उच्च शिक्षित तरुणांना देखील पोलीस व्हायचंय. त्यामुळे बेरोजगारीचे (Unemployment) कारण पुन्हा एकदा समोर आले आहे. 

पोलीस भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले. या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंतचे शिक्षण घेतलेले अनेक उमेदवार आहेत. यामध्ये डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, एमबीए, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेलल्या उच्चशिक्षितांनाही सरकारी नोकरी हवी आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी अर्जांची संख्या आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिल्यावर बेरोजगारीचे वास्तव्य समोर येत आहे.

राज्यातील पोलीस दलात जेल वॉर्डन, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी बारावी उतीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या अर्जांची छननी झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्याला सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही हे सर्वात मोठे कारण यानिमित्ताने समोर आले आहे. 

देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक महाराष्ट्र पोलीस दल आहे. पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध पातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात लेखी चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन पोलीस दलात सहभागी होत येणार आहे.

दरम्यान, अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.