टीईटी लवकरच बारावीपर्यंत बंधनकारक होणार

NEP अंतर्गत, बारावीच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होणार आहे. लवकरच त्याबाबतची अंमलबजावणी होणार आहे.

टीईटी लवकरच बारावीपर्यंत बंधनकारक होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 (Education Policy-2020) अंतर्गत नियमांमध्ये अनेक बदल (Change in rules) करण्यात आले आहेत. मुलांचे शिक्षण, नमुने तसेच शिक्षक होण्याच्या पात्रतेशी संबंधित हे बदल केले जात आहेत. आधी खाजगी किंवा सरकारी शाळेत आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी (TET) देणे आवश्यक होते. मात्र, आता NEP अंतर्गत,इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले जाणार असून त्याबाबतची अंमलबजावणी लवकरच  केली जाणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या टप्यात बारावीपर्यंत टीईटी हा नियम हरियाणा, केरळ, ओडिशा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. या राज्यांमध्ये STET म्हणजेच राज्य शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 12 वी पर्यंत लागू करण्यात आली आहे.  लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये बारावीपर्यंत टीईटीचा नियम लागू केला जाणार आहे. 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय स्तरावरील शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. CTET स्कोअर आयुष्यभर वैध आहे. सीटीईटीच्या धर्तीवर आता टीईटी आयुष्यभर वैध करण्याची योजना आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये, TET परीक्षेचा एक पेपर अजूनही इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे आणि दुसरा पेपर 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतला जातो.मात्र, आता तो इयत्ता नववी ते बारावीसाठी बंधनकार केला जाणार आहे.