NEET पेपर लीक प्रकरणावर एनडीए खासदारांच्या बैठकीत चर्चा; पंतप्रधानांनी मोठं विधान केल्याची माहिती

बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पंतप्रधानमोदींनी पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

NEET पेपर लीक प्रकरणावर एनडीए खासदारांच्या बैठकीत चर्चा; पंतप्रधानांनी मोठं विधान केल्याची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरात NEET परीक्षेतील (NEET Exam) पेपर लीक घोटाळ्याने (Paper leak scam) मोठी खळबळ माजली आहे. संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार आंदोलन सुरू केले असून न्यायाची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने एनडीए खासदारांची 'मंगल मिलन' बैठक (Mangal milan meeting)  झाली, ज्यात पंतप्रधानांनी स्वतः हा मुद्दा उपस्थित केला.

बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rejeju) यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सरकार कठोर भूमिका घेईल, असे आश्वासन रिजिजू यांनी दिले. पंतप्रधानांनी यावेळी हेही नमूद केले की, पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर सर्व राज्य सरकारे आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन यासाठी लढा द्यावा लागेल.

सोमवारी जंतरमंतरवर हजारो आंदोलकांनी पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी करत निदर्शने केली. या वाढत्या विरोधानंतर केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत १३ जणांना अटक केली. पंतप्रधान मोदींनी बैठकित सांगितले की, घोटाळ्याची बातमी समोर येताच सरकारने त्वरित पावले उचलली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी NEET च्या फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली. रिजिजू यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणतीही गय करणार नाही आणि दोषींवर कठोर शिक्षा सुनिश्चित केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारची ही आक्रमक भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लागले आहे. पंतप्रधान मोदींच्या विधानामुळे एनडीएमध्ये एकजुटीचा संदेश मिळाला असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पंतप्रधानमोदींनी पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सरकार कठोर भूमिका घेईल, असे आश्वासन रिजिजू यांनी दिले.