वानरांचा उच्छाद! नंदुरबारमध्ये ४ विद्यार्थिनी आणि एका शिक्षकाला चावा; शाळा-कॉलेज बंद ठेवण्याची नामूष्की

शहरातील दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल आणि आसपासच्या महाविद्यालयांमध्ये हे दोन वानर सकाळी १० च्या सुमारास येतात. प्रथम मैदानात फिरणारे हे वानर नंतर वर्गखोल्यांमध्ये शिरतात. विद्यार्थ्यांना वानर पाहण्याचे आकर्षण असल्याने ते त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करतात. यावेळी वानर आक्रमक होऊन हल्ला करतात.

वानरांचा उच्छाद! नंदुरबारमध्ये ४ विद्यार्थिनी आणि एका शिक्षकाला चावा; शाळा-कॉलेज बंद ठेवण्याची नामूष्की

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नंदुरबार शहरात (Nandurbar city) गेल्या काही दिवसांपासून दोन वानरांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये (School and College) दहशत माजवली आहे. या वानरांच्या हल्ल्यात आतापर्यंत चार विद्यार्थिनी आणि एक शिक्षक जखमी (4 students and a teacher injured) झाले आहेत. वानरांच्या या उच्छादामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण (An atmosphere of fear in the school) निर्माण झाले असून, काही शाळांना सुट्ट्या देण्याची नामुष्की ओढवली आहे.

शहरातील दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल आणि आसपासच्या महाविद्यालयांमध्ये हे दोन वानर सकाळी १० च्या सुमारास येतात. प्रथम मैदानात फिरणारे हे वानर नंतर वर्गखोल्यांमध्ये शिरतात. विद्यार्थ्यांना वानर पाहण्याचे आकर्षण असल्याने ते त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करतात. यावेळी वानर आक्रमक होऊन हल्ला करतात. नुकताच एका शिक्षकाला हल्ला झाला आणि ते खाली पडून जखमी झाले. याआधी देखील चार विद्यार्थिनींना या वानरांनी चावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. 

वन विभागाने गेल्या दोन दिवसांपासून या वानरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. नेमके शाळा आणि महाविद्यालय भरले की, या वानरांचे आगमन होते. यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक चिंतेत आहेत. शाळा व महाविद्यालय प्रशासने वन विभागाला वानरांना पकडून जंगलात सोडण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने काही शाळांनी तात्पुरते सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शाळा भरवत असलेल्या ठिकाणीही भीतीचे वातावरण असल्याने उपस्थिती घटली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या वानरांना खायला घालू नये किंवा त्यांच्या जवळ जाऊ नये. त्यांना चिडवल्यास ते अधिक आक्रमक होऊ शकतात.

नंदुरबार शहरातील ही घटना केवळ एका शाळेची समस्या न राहता संपूर्ण शैक्षणिक वातावरणाला धोका निर्माण करणारी ठरली आहे. वन विभागाने लवकरात लवकर या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदारपणे होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.