मानवी हक्कांच्या विस्तारात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्वाची

भारतात मानवी हक्कांची जपणूक व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी यासंबंधीच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.त्यामुळे मानवी हक्कांच्या व्याख्येचा विस्तार झाला असून बळकटी मिळाली आहे'. 

मानवी हक्कांच्या विस्तारात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्वाची

'भारतात मानवी हक्कांच्या विस्तारात आणि संरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) महत्वाची भूमिका बजावली असून त्यासंबंधी भारताची भूमिका अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महत्वपूर्ण ठरली आहे',असे प्रतिपादन न्या. हिमा कोहली यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या (Bharati Vidyapeeth)न्यू लॉ कॉलेजतर्फे आयोजित 'न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन' च्या उद्घाटन प्रसंगी न्या. हिमा कोहली बोलत होत्या. या प्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ. विवेक सावजी,डॉ विवेक बेखोरो एलिअसक्रोव्ह,भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे उपस्थित होते.

हिमा कोहली म्हणाल्या, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हे भारतातील मानवी हक्कांच्या जपणुकीचे महत्वपूर्ण उदाहरण असून सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधी वेळोवेळी सकारात्मक आणि संरक्षक भूमिका घेतली आहे. भारतात मानवी हक्कांची जपणूक व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी यासंबंधीच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.त्यामुळे मानवी हक्कांच्या व्याख्येचा विस्तार झाला असून बळकटी मिळाली आहे'. 

'तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीने काही वेळा मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र दिसत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स,फेशल रेकग्निशन,बायोमेट्रिक माहितीचे अनधिकृत हस्तांतरण ,सोशल मीडिया माध्यमातून होणारे शोषण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देखरेख ठेवणे, खासगी अधिकारांवर गदा आणणे, भेदभाव करणे दिसून येत आहे.त्याबाबत सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन होणार नाही यासाठी दक्ष आहे',असेही हिमा कोहली यांनी सांगितले. 

------------------