पालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी धुवून घेतले नगरसेविकेचे पाय; पुण्यात संतापजनक प्रकार

पुणे महानगरपालिकेच्या सुखसागर नगर येथील एका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकाचे पाय धुवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी धुवून घेतले नगरसेविकेचे पाय; पुण्यात संतापजनक प्रकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे महानगरपालिकेच्या सुखसागर नगर येथील (Sukhsagar Nagar School Incident) एका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित (Guru Purnima inappropriate type) कार्यक्रमात शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकाचे पाय धुवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा भीमराव साठे (The story of Varsha Sathe washing feet) असे या नगरसेविकेचे नाव असून त्या भाजपच्या स्थानिक नगरसेवका असल्याचे माहिती आहे. ५-६ वर्षाचे चिमुकले विद्यार्थी (Washing the feet of young students) या नगरसेवका मॅडमचे यांचे पाय धुतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार,  गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या निमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारची ‘गुरुपूजा’ करण्यास सांगितल्याचे दिसते. या प्रकाराने पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. शाळा ही शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची ठिकाणे असावीत, व्यक्तिपूजेची केंद्र बनू नयेत. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके, पेन आणि संविधान असावे, कोणत्याही व्यक्तीची पूजा नव्हे,” अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने संविधानिक मूल्यांवर घाला घातल्याची भावना व्यक्त करत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिका शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे नियोजन कसे केले? चिमुकल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संस्कारशिक्षण देणे योग्य आहे का? या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य संबंध साजरा करण्याचा उत्सव असला तरी, आधुनिक शिक्षण पद्धतीत समानता आणि लोकशाही मूल्ये जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.

अमोल परदेशी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालक आणि सामाजिक कार्यकर्तेही संताप व्यक्त करत आहेत.