11th Admission : अकरावी प्रवेशासाठी आजपासून विशेष फेरीचे आयोजन
प्रवेश वाटप प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी पार पडेल. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाटपाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल आणि संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती मिळेल. वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून १० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या (Academic year 2026-27) इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी (1.5 million student registrations) केली असून सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित (12.98 lakh students have confirmed their admission) केले आहेत. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ पासून विशेष फेरीचे आयोजन (Organization of a special trip) करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी दिली आहे.
विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. पसंतीक्रम आणि गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप केले जाईल. नवीन नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्तीची सुविधा ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. याच कालावधीत पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम स्वरूपात लॉक करता येईल.
प्रवेश वाटप प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी पार पडेल. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाटपाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल आणि संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती मिळेल. वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून १० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल.
११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांची माहिती जाहीर होईल. इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घ्यावेत. तसेच अधिक माहितीसाठी mahafyjcadmissions.in संकेतस्थळ किंवा हेल्पलाईन ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.