बालभारतीने तिसरीच्या पुस्तकातील चूक केली दुरुस्त; पहिली मुलींची शाळा होय...

'माहित आहे का तुम्हाला' या चौकटीमध्ये ही "महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय, असे वाक्य वापरण्यात आले होते. मात्र,या वाक्य ऐवजी 'ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय, ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय, असा बदल करण्यात आला आहे."

बालभारतीने तिसरीच्या पुस्तकातील चूक केली दुरुस्त; पहिली मुलींची शाळा होय...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बालभारतीतर्फे चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नवी कोरी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. मात्र, या पुस्तकात आपल्या सभोवतालचे जग भाग दोन पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 15  वरील 'माहित आहे का तुम्हाला ?' या चौकटीत वापरण्यात आलेले वाक्य बालभारतीने दुरुस्त केले आहे. याबाबतचे परिपत्रक बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केले आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन पुस्तके तयार केली जात आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार पुस्तक उपलब्ध व्हावेत,असा बालभारतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार बालभारतीतर्फे इयत्ता तिसरीसाठी नवीन पुस्तक तयार करण्यात आले. तिसरीच्या पुस्तकातील पान क्रमांक पंधरा वरील 'माहित आहे का तुम्हाला' या चौकटीमध्ये ही "महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय, असे वाक्य वापरण्यात आले होते. मात्र,या वाक्य ऐवजी 'ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय, ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय, असा बदल करण्यात आला आहे."

माहित आहे का तुम्हाला? 

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे यासाठी खूप कष्ट घेतले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय. सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे मुलींच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत. सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका होत्या. असा मजकूर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये होता. शुद्धिपत्र प्रसिद्ध केल्यामुळे आता बदललेल्या मजकुराचा समावेश होणार आहे.