TET Exam : २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना 'टीईटी'साठी नो एंट्री? काय आहे नियम वाचा..
परीक्षेचे दोन पेपर होणार असून, पेपर-एक (इयत्ता १ ली ते ५ वी) सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत तर पेपर-दोन (इयत्ता ६ वी ते ८ वी) दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या मुख्यालयात परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) येत्या रविवारी २८ जून २०२६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) राज्यभरात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वा लाखांहून अधिक अर्ज (Over 1.25 lakh applications) झाले आहेत. यावेळी परीक्षा परिषदेकडून काही कडक नियम लागू (Strict rules enforced) करण्यात आले आहेत. त्यानुसार पेपर सुरू होण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी केंद्रावर पोहोचणे बंधनकारक (Arrival 20 minutes in advance is mandatory) असून, उशिरा आल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने सेवेत असलेले शिक्षक तसेच शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचे दिसून येत आहे.
परीक्षेचे दोन पेपर होणार असून, पेपर-एक (इयत्ता १ ली ते ५ वी) सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत तर पेपर-दोन (इयत्ता ६ वी ते ८ वी) दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल. राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या मुख्यालयात परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. एकूण १,४०० हून अधिक केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराची बोटांचे ठसे, चेहरा ओळख आणि मेटल डिटेक्टर तपासणी अनिवार्य आहे. परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही निरीक्षण राहील आणि जिल्हा स्तरावर तसेच पुणे येथे राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कडक नियम आणि सूचना
उमेदवारांना पेपर सुरू होण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी केंद्रावर पोहोचणे बंधनकारक असून, उशिरा आल्यास प्रवेश दिला जाणार नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा स्मार्ट कार्ड यापैकी एक ओरिजनल ओळखपत्र बरोबर असणे आवश्यक आहे. बूट घालण्यास बंदी असून, पारदर्शक पाण्याची बाटली परवानगी आहे. दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी इत्यादी घालता येणार नाहीत जेणेकरून चेहरा स्पष्ट दिसेल.
सध्या पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा आंदोलन-मोर्च्यांची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांनी पुरेसा वेळ ठेवून निघावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, “परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. नियंत्रण कक्षाद्वारे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाईल आणि वेळेत येणाऱ्या उमेदवारांनाच प्रवेश मिळेल.” ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिक्षक पदासाठी आयुष्यभर वैध प्रमाणपत्र मिळणार आहे. सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.