दहावी-बारावीच्या हाॅल तिकिटवर महत्त्वाचा बदल, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिक्षण मंडळाचा निर्णय

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता विषयांसोबतच वेळेचाही उल्लेख करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पाहण्याऐवजी आता विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रावरच कोणत्या विषयाचा पेपर कधी आहे. पेपरची वेळ काय आहे याची सर्व माहिती मिळणार आहे. 

दहावी-बारावीच्या हाॅल तिकिटवर महत्त्वाचा बदल, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिक्षण मंडळाचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी-बारावीच्या हाॅल तिकिटवर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता विषयांसोबतच वेळेचाही उल्लेख (Time mentioned on the 10th-12th class timetable) करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पाहण्याऐवजी आता विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रावरच कोणत्या विषयाचा पेपर कधी आहे. पेपरची वेळ काय आहे,  याची सर्व माहिती मिळणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा प्रचलित वेळेच्या दहा दिवस आधी घेण्याचा निर्णय मंडळाने यावर्षी घेतला, तसेच अनेक बदल राज्य मंडळाने या परीक्षेमध्ये केलेले आहेत. नुकताच दहावी, बारावीच्या परीक्षांच्या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला होता. परंतू, या निर्णयावर टीका झाल्यानंतर तो रद्द करण्यात आला.

राज्य मंडळाची इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असून ११ मार्च रोजी संपणार आहेत. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून १७ मार्च रोजी संपणार आहेत. हॉल तिकिटामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयााच्या तारखा व वेळ देण्यात आलेल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार वेळापत्रक पाहावे लागणार नाही. हाॅल तिकिट वरूनच विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाचा पेपर कधी व वेळ काय आहे हे समजणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, पालकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.