NCERT ने नवीन अभ्यासक्रमात चीन-बॉर्डर ॲटॅक विषयात केला बदल 

"भारतीय सीमेवर चीनच्या आक्रमकतेने ती आशा धुळीस मिळवली आहे."

NCERT ने नवीन अभ्यासक्रमात चीन-बॉर्डर ॲटॅक विषयात केला बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NCERT कडून वेळोवेळी आपल्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. बाबरी मशीद (Babri Masjid), गुजरात दंगल या विषयांमधील बदलानंतर आता NCERT ने चीन-बॉर्डर ॲटॅक (China-Border Attack), पीओके या विषयांमध्ये देखील बदल केले आहेत. तसेच आर्टिकलं 370 या विषयाचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे. 

आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध विभागांसाठी एनसीईआरटीच्या बारावी च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून चीनसोबतच्या भारताच्या सीमा परिस्थितीचा संदर्भ बदलण्यात आला आहे. Contemporary World Politics या पुस्तकात पान क्र.  25 वर, "तथापि, दोन देशांमधील सीमा विवादावर झालेल्या लष्करी संघर्षाने त्या आशा धुळीस मिळवल्या" असे लिहिले होते, जे बदलून "भारतीय सीमेवर चीनच्या आक्रमकतेने ती आशा धुळीस मिळवली आहे." एनसीआरटीने म्हटले आहे की, "प्रकरणाच्या संदर्भाशी जुळणारे वाक्य बदलले आहे."

परिच्छेदात नमूद केलेला संदर्भ जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असतानाच्या काळातील आहे. या काळात ‘हिंदी-चीनी भाई भाई’ ही घोषणा लोकप्रिय झाली. पुस्तकातील परिच्छेद 1950 मध्ये चीनच्या तिबेटवरील ताबा आणि चीन-भारत सीमेवरील अंतिम करार, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील अक्साई चिन प्रदेशातील प्रतिस्पर्धी प्रादेशिक दावे आणि 1962 च्या युद्धाशी संबंधित आहेत. केवळ भारत-चीन संबंधच नाही तर इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकातील 'पॉलिटिक्स इन इंडिया फ्रॉम इंडिपेंडन्स'मध्येही 'आझाद पाकिस्तान' हा शब्द बदलून 'पाकिस्तान व्याप्त काश्मीर' असा करण्यात आला आहे.