CBSE चा मोठा निर्णय! १०वी ची पहिली बोर्ड परीक्षा चुकवणाऱ्यांना, दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही
दोन-परीक्षा प्रणाली सुरू झाल्यावर 10वीच्या विद्यार्थ्यांना पहिली बोर्ड परीक्षा द्यावीच लागेल. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील शैक्षणिक वर्षातच मुख्य परीक्षा द्यावी लागेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) मोठा आणि महत्त्वाचा नवीन १०वी बोर्ड परीक्षा २०२६ (Board Exam 2026 New Rules) पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, १०वीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहेत. मात्र, यातील पहिली परीक्षा ही आता सक्तीची (First exam is mandatory) करण्यात आली आहे. पहिली परीक्षा न दिलेल्या रिपीटर्स यांना दुसरी परीक्षा देता येणार नाही (Repeaters are not allowed to take a second exam), असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - शिक्षण धक्कादायक! अजितदादा गेले अन् ४ दिवसांत ७५ शाळांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्र मिळाले..
दोन-परीक्षा प्रणाली सुरू झाल्यावर 10वीच्या विद्यार्थ्यांना पहिली बोर्ड परीक्षा द्यावीच लागेल. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील शैक्षणिक वर्षातच मुख्य परीक्षा द्यावी लागेल. पहिली परीक्षा चुकवणारे विद्यार्थी थेट दुसऱ्या परीक्षेला बसू शकतात का, अशी विचारणा पालक आणि शाळांकडून CBSE कडे आल्यानंतर हे स्पष्टीकरण बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा द्यावी लागेल. जे उत्तीर्ण होतील त्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची परवानगी दिली जाईल. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यांसारख्या विषयांसाठी गुण सुधारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र, जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहतील, ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र नसतील. अशा उमेदवारांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य बोर्ड परीक्षेला पुन्हा बसावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कंपार्टमेंट मिळेल, त्यांना कंपार्टमेंट श्रेणीअंतर्गत दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे.
10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषयांना परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वेगळे विषय घेता येणार नाहीत. जर एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव मुख्य परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहिला, तर तो सध्याच्या धोरणानुसार दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसू शकत नाही. CBSE ने हेही स्पष्ट केले आहे की, या नियमात सवलत देण्याच्या विनंत्यांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे १०वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची पहिली परीक्षा देणे अनिर्वाह असणार आहे.