पुण्यातील २०० विद्यार्थ्यांनी 'चलो संसद' आंदोलनासाठी दिल्ली गाठली; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

विद्यार्थ्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था अभूतपूर्व संकटात सापडल्याचा आरोप केला. नीट, यूजीसी-नेटसारख्या राष्ट्रीय परीक्षा आणि राज्यातील टीईटी, तलाठी, आरोग्य भरती घोटाळ्यांमुळे परीक्षा पद्धतीवरचा विश्वास उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील २०० विद्यार्थ्यांनी 'चलो संसद' आंदोलनासाठी दिल्ली गाठली; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नीट आणि इतर परीक्षेतील पेपरफुटी, (Exam Leak) शिक्षणाचे खासगीकरण आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या 'चलो संसद' आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी दिल्ली गाठली (200 students reached Delhi) आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा (Demand for Dharmendra Pradhan's resignation) द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सामान्य रेल्वे डब्यात गर्दीत उभे राहून तासन्‌तास प्रवास केल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी हा लढा असल्याचे सांगितले. 

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या जनआंदोलनात 'ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन' (AISF) च्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी सक्रिय सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था अभूतपूर्व संकटात सापडल्याचा आरोप केला. नीट, यूजीसी-नेटसारख्या राष्ट्रीय परीक्षा आणि राज्यातील टीईटी, तलाठी, आरोग्य भरती घोटाळ्यांमुळे परीक्षा पद्धतीवरचा विश्वास उडाला असल्याचे त्यांनी सांगितले. रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी भ्रष्ट व्यवस्था आणि पेपर माफियांचे बळी ठरत असल्याची व्यथा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. NTA बरखास्त करावी आणि परीक्षा पद्धतीत आमूलागामी बदल करावेत. आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, पण भ्रष्ट व्यवस्थेमुळे आमच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहोत, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन पुणे समन्वयक श्रावणी बुवा या विद्यार्थिनीने दिली आहे. 

”विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याचा आणि वाढत्या फीमुळे सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोपही केला. शिक्षण हा हक्क असून सर्वांना समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पा