RTE admission: आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला का? आतापर्यंत किती अर्ज आले?

आतापर्यंत राज्यात ८ हजार ८६३ शाळांनी नोंदणी केली असून यासाठी एकूण १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध आहे. आत्तापर्यंत १ लाख ३६ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत अर्ज केले आहेत.

RTE admission: आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला का? आतापर्यंत किती अर्ज आले?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई -Right To Education) अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रियेला (admission process) सुरुवात झाली असून पालक आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. या अर्ज प्रक्रियेला  १४ जानेवारीपासून सुरुवात झाली असून २७ जानेवारी ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अद्यापही अर्ज केले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचे अर्ज भरावे, असे शिक्षण विभागामार्फत (Department of Education) आवाहन करण्यात आले आहे.       

आतापर्यंत  राज्यात ८ हजार ८६३ शाळांनी नोंदणी (registration) केली असून प्रवेशासाठी एकूण १ लाख ९ हजार १११ जागा (vacancy) उपलब्ध आहे. त्यात आत्तापर्यंत  १ लाख ३६ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज (Apply for admission) केला आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने पालकांना काही सूचना दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालकांनी आरटीईसाठी खोटी कागदपत्रे/माहिती सादर केली तर त्यांना कारवाईस पात्र व्हावं लागणार आहे. याशिवाय आपल्या पाल्याचा अर्ज चुकला तर पालकांना पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा लागेल आणि नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे, असेही शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.