बी.एड महाविद्यालयांच्या ग्रंथालयात किमान ४ हजार पुस्तके बंधनकारक ; अन्यथा NCET चा इशारा
बी.एड महाविद्यालयांच्या ग्रंथालयात किमान ४ हजार पुस्तके बंधनकारक ; अन्यथा NCET चा इशारा
NCET च्या नवीन नियमांनुसार, महाविद्यालयांना त्यांच्या ग्रंथालयात NCERT आणि NCTE व्यतिरिक्त इतर अनेक पुस्तके ठेवावी लागतील. या संदर्भात, एनसीटीईने सर्व बी.एड महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. परिषदेने बी.एड महाविद्यालयांना दरवर्षी १०० नवीन चांगली पुस्तके खरेदी करून ग्रंथालयात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार एनसीटीई अनेक बदल करत आहे.
देशभरातील बी.एड महाविद्यालयांना (B.Ed colleges across the country) त्यांच्या ग्रंथालयात किमान ४,००० पुस्तके ठेवावी लागतील. (The library will have to have at least 4,000 books) जर कोणत्याही महाविद्यालयाने हा नियम पाळला नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, (If the college does not follow this rule, action may be taken) अशी ताकीद राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) NCET च्या वतीने देण्यात आली आहे.
NCET च्या नवीन नियमांनुसार, महाविद्यालयांना त्यांच्या ग्रंथालयात NCERT आणि NCTE व्यतिरिक्त इतर अनेक पुस्तके ठेवावी लागतील. या संदर्भात, एनसीटीईने सर्व बी.एड महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. परिषदेने बी.एड महाविद्यालयांना दरवर्षी १०० नवीन चांगली पुस्तके खरेदी करून ग्रंथालयात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार एनसीटीई अनेक बदल करत आहे.
अलिकडेच, एक वर्षाचे बी.एड आणि एक वर्षाचे एम.एड अभ्यासक्रमांनाही एनसीटीईने मान्यता दिली आहे. तसेच परिषदेने बी.एड महाविद्यालयांमध्ये संसाधन केंद्रे उघडण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. बी.एड महाविद्यालयांमध्ये उघडल्या जाणाऱ्या संसाधन केंद्रांमध्ये शालेय मुलांशी संबंधित शिक्षक साहित्य तयार केले जाईल. हे साहित्य बी.एडचे विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने तयार करतील. ही केंद्रे सर्व दोन वर्षांच्या आणि चार वर्षांच्या बी.एड महाविद्यालयांमध्ये उघडली जातील. एनसीटीईच्या मते, याद्वारे बी.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत मुलांना कसे शिकवले जाते हे देखील कळेल.
"एकीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे राज्य शासनाकडून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्याचा जीआर काढण्यात आला आहे."; शासनाचे हे धोरण योग्य वाटते का ?