शिक्षकांना राहावे लागणार शाळेच्या ठिकाणी मुक्कामी, भाजप आमदाराचे नवीन आदेश

प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना हे वाद काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत बंब मुख्यालय म्हणजे जे शिक्षक मुक्कामी राहत नाहीत अशा शिक्षकांच्या विरोधात आवाज उठवत आलेले आहेत. विधानसभेत देखील त्यांनी अनेकदा हे मुद्दे मांडले होते.

शिक्षकांना राहावे लागणार शाळेच्या ठिकाणी मुक्कामी, भाजप आमदाराचे नवीन आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांनी एक नवीन आदेश (New Order) दिला आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे १५ जूननंतर ज्या गावात शिक्षक मुख्यालय असणार (The teachers will stay overnight) नाही अशा गावांना आपण निधी देणार नाहीत, असा थेट इशारा आमदार बंब यांनी दिला आहे. यामुळे शिक्षक संघटना (Teachers' Association) विरूद्ध प्रशांत बंब असा सामना पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना हे वाद काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत बंब मुख्यालय म्हणजे जे शिक्षक मुक्कामी राहत नाहीत अशा शिक्षकांच्या विरोधात आवाज उठवत आलेले आहेत. विधानसभेत देखील त्यांनी अनेकदा हे मुद्दे मांडले होते. त्यानंतर काही आदेश देखील निघाले. मात्र, आता त्यांनी आणखी एक नवीन इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिक्षक संघटना काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

"गावातल्या शिक्षकांना गावात थांबू द्या. आपण चांगले शिक्षण घेत नाही म्हणून शेतकऱ्यांचे तुकडे पडत आहेत. मी आता जिल्हा परिषदेची मिटिंग घेत आहे. येणाऱ्या जूनपासून जेव्हा नवीन शाळा सुरू होतील तेव्हापासून, ज्या गावाला शिक्षक मुक्कामी राहणार नाहीत, त्या गावाला निधीच देणार नाही, या पातळीवर मी जाणार आहे," अशी रोकठोक भूमिका बंब यांनी मांडली आहे. यानंतर आता, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी गावकऱ्यांची भूमिक महत्त्वाची असणार आहे. कारण शिक्षकांमुळे गावाला निधी मिळणार नसेल तर, गावाचा विकास होणार नाही. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणाला काय वळण मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

___________________________________

पूर्वीच्या काळामध्ये वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे शिक्षक वेळ पाळण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी राहत होते. आता वाहतुकीच्या सुविधेची कोणतीही अडचण नाही. शाळेची जी काही वेळ असेल ती शिक्षकांना पाळायला कोणतीच अडचण येत नाही, तेव्हा मुख्यालयी राहण्याचा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. 

- तानाजी माने, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ