अखेर झुरळांनी करून दाखवल! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट पेपरफुटी प्रकरणात सातत्याने वाढत असलेल्या विरोध आणि आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज २५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता.

अखेर झुरळांनी करून दाखवल! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नीट पेपरफुटी प्रकरणात सातत्याने वाढत असलेल्या विरोध आणि आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र (Education Minister Dharmendra) प्रधान यांनी आज २५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला (Pradhan has resigned on July 25.)आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’('Cockroach Janata Party)ने सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव  (The protest has put immense pressure on the government.) निर्माण झाला होता. या राजीनाम्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘कॉक्रोच जनता पार्टी’ने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांवर असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील या मुद्द्यावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले तरी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी केली होती. आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात विरोधी पक्षांनी देखील केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली होती. पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी पूर्ण देश हादरला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

केंद्र सरकारने या राजीनाम्याची औपचारिक घोषणा केली असून, पुढील शिक्षणमंत्र्याची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. नीटसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन मंत्री काय पावले उचलणार, याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे शिक्षण मंत्रालयात प्रशासकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात NTA मधील अनेक अधिकाऱ्यांवर आधीच कारवाई करण्यात आली होती. आता नव्या नेतृत्वाखाली परीक्षा प्रक्रिया अधिक मजबूत आणि विश्वासार्ह करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.