MPSC तलाठी भरती २०२६: १५३९ जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, परीक्षेचे नवे स्वरूप जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागात ग्रामीण प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘तलाठी’ (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण १५३९ जागांसाठी ही भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

MPSC तलाठी भरती २०२६: १५३९ जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, परीक्षेचे नवे स्वरूप जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल ( Village Revenue Officer) आणि वन विभागात ग्रामीण प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘तलाठी’ (The Talathi  who is a crucial part) (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण १५३९ जागांसाठी ही भरती (This recruitment is for 1,539 posts.) निघाली असून, इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज (Online applications for candidates until August 5, 2026) करण्याची संधी उपलब्ध आहे. गावपातळीवरील जनतेशी थेट संपर्क साधणारे हे पद प्रशासनात विशेष महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी २०२३ च्या भरतीत प्रचंड स्पर्धा पाहायला मिळाली होती, त्यामुळे यावर्षीही उमेदवारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे ठेवण्यात आली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे सूट मिळेल. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये आहे. सर्व अर्ज एमपीएससीच्या अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.

तलाठी हे गट-क संवर्गातील पद असून, सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन २५,५०० ते ८१,१०० रुपये इतके आहे. पदवीधर तरुणांसाठी ग्रामीण भागात प्रशासकीय अनुभव घेण्याची आणि जनतेची थेट सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. यातून पुढे उच्च पदांवरही प्रगती करता येऊ शकते.

या भरतीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परीक्षा प्रथमच MPSC मार्फत ऑनलाइन घेतली जाणार आहे. परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील जे २०० गुणांसाठी असतील. परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) असेल. यावेळी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग लागू नसेल, ज्यामुळे उमेदवारांना सर्व प्रश्न सोडवण्याची मोकळीक मिळेल. मराठी विषयाचे प्रश्न उच्च माध्यमिक (१२वी) स्तराचे असतील तर इतर विषय पदवी स्तराचे राहतील.