अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या नोंदणीसाठी आतापर्यंत इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण
आजपर्यंत इयत्ता ११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख १३ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यंदाच्या वर्षापासून (२०२५-२६) संपूर्ण राज्यामध्ये उच्च माध्यमिक शाळांमध्ये (high schools) इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया (11th admission process) केंद्रीय ऑनलाईन प्रणालीव्दारे राबवण्यात येत आहे. https://mahafyjcadmissions.in/landing या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. त्यासाठी आज ५ जून रोजी नोंदणी करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत इयत्ता ११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख १३ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी (students registration) केली आहे.
दिवसनिहाय किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली ?
विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक २६ मे २०२५ पासून संकेतस्थळावर सुरुवात झालेली असून पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दिनांक २७ मे २०२५ रोजी दुसऱ्या दिवशी २ लाख ७ हजार ६१२ इतकी विद्यार्थी नोंदणी झाली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २८ मे २०२५ रोजी १ लाख ४४ हजार ०५७ इतकी विद्यार्थी नोंदणी झाली आहे. चौथ्या दिवशी २९ मे २०२५ रोजी १ लाख ५१ हजार ७३३ इतकी विद्यार्थी नोंदणी झाली आहे. ३० मे रोजी १ लाख १७ हजार ९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ३१ मे रोजी ८२ हजार १३३ इतकी विद्यार्थी नोंदणी झाली आहे. नोंदणीच्या सातव्या दिवशी १ जून रोजी ४० हजार ५७६ इतकी विद्यार्थी नोंदणी झाली. आठव्या दिवशी दिनांक २ जून २०२५ रोजी ९१ हजार ६३२ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. ३ जूनला ६७ हजार ७८३ विद्यार्थी नोंदणी झाली आहे. तसेच दहाव्या दिवशी आज ४ जून २०२५ दिवशी एकूण ५१ हजार ७४ विद्यार्थी नोंदणी झाली आहे. आजपर्यंत इयत्ता ११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी संख्या १२ लाख १३ हजार ४५७ इतकी आहे.
याबरोबरच एकूण ११ लाख ३४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाईन जमा केले आहे. तर ११ लाख २० हजार ३७२ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम करुन लॉक केले आहेत. नियमित फेरीसाठी (कॅप राऊंड) १० लाख ७ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून इनहाऊस कोटासाठी ५३ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी २६ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर अल्पसंख्यांक (मायनॉरिटी) कोटासाठी ४१ हजार ४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.
दरम्यान, इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळावर दिनांक ८ मे ते १७ मे २०२५ दरम्यान राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळांची ९ हजार ३४२ करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांची एकूण प्रवेश क्षमता २ लाख ८८ हजार ४७० असून त्यापैकी कंप फेरी साठी प्रवेश क्षमता १८ लाख ७ हजार ५९७ तसेच कोटा प्रवेश क्षमता २ लाख १३ हजार ३७३ इतकी आहे.