SSC कनिष्ठ अभियंता पदांसाठी १७४८ जागांसाठी भरती सुरू; 'या'  तारखेपर्यंत करा अर्ज

एसएससी जेई भरती २०२६ अंतर्गत १,७४८ ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क तपासा आणि २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा.

SSC कनिष्ठ अभियंता पदांसाठी १७४८ जागांसाठी भरती सुरू; 'या'  तारखेपर्यंत करा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. एकूण १७४८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ssc.gov.in/ वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. 

प्रसिद्ध जाहिरातीनुसार, या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. सिव्हिल अभियंत्रणासाठी संबंधित शाखेत पदवी किंवा पदविका, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल अभियंत्रणातील पदवी/पदविका आणि मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल अभियंत्रणातील पदवी किंवा पदविका आवश्यक आहे. टेलीकॉम शाखेसाठी विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक विज्ञान, आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमधील बी.ई./बी.टेक. मान्य आहे. वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे ठेवण्यात आली आहे. ही भरती अभियंत्रण क्षेत्रातील तरुणांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. 

अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, भूतपूर्व सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. अर्ज दुरुस्तीसाठी पहिल्या वेळी २०० रुपये आणि दुसऱ्या वेळी ५०० रुपये आकारले जातील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२६ आहे. 

इच्छुक उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ssc.gov.in/ वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तेथे अधिसूचना, पात्रता आणि इतर सर्व मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. ही भरती अभियंत्रण पदवीधर आणि पदविकाधारकांसाठी चांगली संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.