पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना, मराठी लेखकाने केली हिंदी सक्तीकरणाची चिरफाड 

पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना. अरविंद जगताप यांच्या पोस्टला नेटकऱ्यांनी दाद देत कमेंट केल्या आहेत.

पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना, मराठी लेखकाने केली हिंदी सक्तीकरणाची चिरफाड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात (Hindi language is compulsory) राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हिंदीकरणाविरोधात आवाज उठवल्यानंतर आता कलाकार, मराठी लेखकांडून आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. पक्षा फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं म्हणा ना, असे परखड लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी व्यक्त केलं आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिल्याचे यातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काळात आणखीन कोणते लेखक आपले मत व्यक्त करतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

काय म्हटलं आहे अरविंद जगताप यांनी?

अरविंद जगताप यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करून म्हटलं आहे की, पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना. अरविंद जगताप यांच्या पोस्टला नेटकऱ्यांनी दाद देत कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत पट ५० असेल आणि 20-20 चे दोन गट पडले एक गट हिंदी तर एक गट कन्नड शिकत असेल तर मग उरलेल्या 10 जणांनी कोणती भाषा शिकायची? विचारणा केली आहे. शिक्षणाचा बाजार मांडल्यानंतर अपेक्षा काय ठेवाव्यात आणि कोणाकडून? अशीही कमेंट एकाने केली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसऱ्या भाषेची सक्ती नसतानाही सरकारी वरवंटा का आणि कोणासाठी फिरवला जात आहे असा सुद्धा संतप्त सवाल महाराष्ट्रातून उपस्थित होत आहे. दरम्यान, मराठी लेखक अरविंद जगताप यांनी अत्यंत तिखट आणि खोचक शब्दात हिंदीकरणाची चिरफाड केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून एकप्रकारे राजकीय सत्तेला चपराक दिली आहे. राज्यातील आमदार फोडाफोडीवरूनच त्यांनी उदाहरण देत हिंदीकरणाला कडाडून विरोध केला आहे.