आम्हाला वाटलं आम्ही जिवंत परतणार नाही;इराणहून भारतीय विद्यार्थी परतले

मरीया मंझर (२१ वर्ष) या भारतात परतलेल्या विद्यार्थिनीने  सांगितलं ती मागच्या दहा महिन्यांपासून इराणमध्ये MBBS अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. साधारण आठवड्याभरापूर्वी मला तेहरान येथील महाविद्यालायतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आम्हाला कूवोम या ठिकाणी नेण्यात आलं. मात्र त्या ठिकाणीही हल्ले सुरू होते-त्यानंतर आम्हाला मशहाद या ठिकाणी नेण्यात आलं, आम्ही तीन दिवस तिथल्या हॉटेलमध्ये होतो. आम्ही तिथली भयंकर परिस्थिती पाहिली आहे.

आम्हाला वाटलं आम्ही जिवंत परतणार नाही;इराणहून भारतीय विद्यार्थी परतले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इराण आणि इस्रायल (Iran and Israel War) यांच्यातल्या संघर्षाची धार आणखी तीव्र होते आहे. दरम्यान ऑपरेशन सिंधु (Operation sindhu) राबवत आत्तापर्यंत ८२७ भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना इराणमधून भारतात (Students from Iran to India) आणण्यात आलं आहे. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी काही काश्मिरी विद्यार्थी, विद्यार्थिनी इराणहून परतले त्यावेळी त्यांनी तिथली भयावह परिस्थिती काय आहे ते सांगितलं. मरीया म्हणाली, मला तर वाटलं होतं मी भारतात परत जिवंत जाऊच शकणार नाही, अशी तेथील युद्धाची परिस्थिती आहे. 

मरीया मंझर (२१ वर्ष) या भारतात परतलेल्या विद्यार्थिनीने  सांगितलं ती मागच्या दहा महिन्यांपासून इराणमध्ये MBBS अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. साधारण आठवड्याभरापूर्वी मला तेहरान येथील महाविद्यालायतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आम्हाला कूवोम या ठिकाणी नेण्यात आलं. मात्र त्या ठिकाणीही हल्ले सुरू होते-त्यानंतर आम्हाला मशहाद या ठिकाणी नेण्यात आलं, आम्ही तीन दिवस तिथल्या हॉटेलमध्ये होतो. आम्ही तिथली भयंकर परिस्थिती पाहिली आहे. मरिया प्रमाणेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनाही हेच अनुभव आहे. मरीया म्हणाली मला तर वाटलं होतं की मी भारतात परत जाऊ शकणार नाही. खरंतर तेहरान हे शिक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे. तिथे जाऊन मला पुढे शिक्षण घ्यायला नक्कीच आवडेल पण आता काय होतंय ते माहीत नाही.

फातिमा अलवारी या २२ वर्षीय विद्यार्थिनीने सांगितलं आमच्या डोळ्यांसमोर हल्ले होत होते. सगळं काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत होतं. दुतावासाने आम्हाला शनिवारी त्या ठिकाणाहून सोडवलं. आम्हीही मशहाद या ठिकाणी हॉटेलमध्ये होतो. मी त्या संघर्षातून आणि युद्धस्थितीतून भारतात परतले आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. फातिमा दिल्लीत आली आणि त्यानंतर ती श्रीनगरला गेली आहे.