11h Admission : ११वी प्रवेशासाठी १६ जुलैपासून विशेष फेरीची घोषणा, सुधारित वेळापत्रक जाहीर
सुधारित वेळापत्रकानुसार १६ जुलै दुपारी ३ वाजेपासून ते १८ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-२ भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण संचालनालयाने (Directorate of Education) अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (11th Admission Process) आणखी एक विशेष फेरी जाहीर (Special trip announced) केली आहे. नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही फेरी १६ जुलैपासून सुरू (The round starts from July 16) होणार असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी ही फेरी अत्यंत महत्वाची (The ferry is extremely important) ठरणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, १६ जुलै दुपारी ३ वाजेपासून ते १८ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-२ भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. या फेरीचे प्रवेश वाटप १९ जुलै रोजी होईल, तर २० जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २० ते २२ जुलै दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे.
२३ जुलै रोजी संपूर्ण माहिती प्रक्रिया पूर्ण होईल आणि २४ जुलै दुपारी १ वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. उशिरा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही नवीन विशेष फेरी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी आहे. ज्यांना अद्याप इच्छित महाविद्यालय मिळाले नाही त्यांनी ऑनलाइन पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी. वेळेच्या मर्यादेमुळे कोणतीही चूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.