महाराष्ट्र बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय! १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक अन् सनद एकत्र मिळणार
पूर्वी निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना फक्त गुणपत्रक दिले जात असे, तर सनद मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागायची. या प्रक्रियेमुळे अनेकदा विद्यार्थी आणि संस्थांना पडताळणीत अनेकदा विलंब होत असे. मात्र आता या बदलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, प्रक्रिया सोपी होईल आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल, असे देखील सांगण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १०वी आणि १२वी विद्यार्थीसाठी (10th and 12th Class Students) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुर्वी स्वतंत्र गुणपत्रक आणि सनद मिळत होते. आता त्याऐवजी एकच एकत्रित दस्तऐवज (Consolidated Document) मिळेल. तसेच, या नवीन दस्तऐवजावर विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड असेल, जेणेकरून दस्तऐवजाची ओळख आणि सत्यता पडताळता येईल, (Authenticity can be verified) असे नमूद करण्यात आले आहे.
पूर्वी निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना फक्त गुणपत्रक दिले जात असे, तर सनद मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागायची. या प्रक्रियेमुळे अनेकदा विद्यार्थी आणि संस्थांना पडताळणीत अनेकदा विलंब होत असे. मात्र आता या बदलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, प्रक्रिया सोपी होईल आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल, असे देखील सांगण्यात आले आहे.
डिजिटल युगात, ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपाय असेल. क्यूआर कोडच्या मदतीने, महाविद्यालये, विद्यापीठे किंवा इतर संस्था कागदपत्रांची जलद पडताळणी करू शकतात, जे भविष्यातील शैक्षणिक किंवा प्रशासकीय कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. QR कोडमुळे कागदपत्रांची पटकन तपासणी होईल. बोर्डाच्या अधिकृत अँपवर स्कॅन केल्यावर मार्कशीटची खरी माहिती लगेच दिसेल. याने बनावट आणि फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.
विद्यार्थ्याचे नाव आधार कार्डनुसार छापले जाईल. अर्धी अक्षरे वेगवेगळ्या क्रमाने लिहिली जातील, जेणेकरून ती अधिक सोपी आणि एकसमान दिसतील. गुणपत्रिकेत फोटो आणि क्यूआर कोड समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे ती अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय होईल. महाविद्यालये, विद्यापीठे किंवा इतर संस्था गुणपत्रिका स्कॅन करून तिची त्वरित पडताळणी करू शकतील.