आनंदाची बातमी: शिक्षकांची BLO ची कामे रद्द; जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

शिक्षकांना नियुक्ती न देता ग्रामीण भागामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेविका, विद्युत वितरण कंपनीचे मीटर रीडिंग घेणारे कर्मचारी, पोस्टमन व असे कर्मचारी ज्यांना संबंधित गावातील स्थानिक माहिती आहे.त्याचप्रमाणे इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी.

आनंदाची बातमी: शिक्षकांची BLO ची कामे रद्द; जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांना सहाय्य करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे SIR च्या अनुषंगाने बीएलओ यांना देण्यात आलेले सहाय्यक हे बहुतांश प्रमाणात शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहाय्यक म्हणून नियुक्ती केलेल्या शिक्षक संवर्गातील कर्मचारी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे, असे आदेश धाराशिवचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काढले आहेत.

कीर्ती किरण पुजार यांनी काढलेल्या केलेल्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहाय्यक म्हणून शिक्षकांना नियुक्ती न देता ग्रामीण भागामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेविका, विद्युत वितरण कंपनीचे मीटर रीडिंग घेणारे कर्मचारी, पोस्टमन व असे कर्मचारी ज्यांना संबंधित गावातील स्थानिक माहिती आहे.त्याचप्रमाणे इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच शहरी भागामध्ये दिलेल्या माहितीनुसार इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. 

शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नयेत, अशी मागणी वारंवार केली जात आहे.शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याची गैरसोय होते. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मार्ग काढला जात असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले होते. 

धाराशिव येथील शिक्षकांची बी एल ओ च्या कामातून एक प्रकारे मुक्तता झाली आहे. मात्र एकट्या धाराशिव जिल्ह्यात शिक्षक बेलोच्या कामासाठी नाहीत तर पूर्ण राज्यभर शिक्षकांनाही कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील इतरही जिल्ह्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.