OBC Students : राज्य सरकारचा मोठा निर्णय : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार

OBC Students : राज्य सरकारचा मोठा निर्णय : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मिळणार वर्षाला 60 हजार
OBC Students

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme : शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची (Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme) घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शहरात राहून उच्च शिक्षण घेण्याऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. 

राज्य सरकारने बुधवार (ता. 13) उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना"ची घोषणा केली. त्या माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता OBC विद्यार्थ्यांना मिळणार आहे.  

शहरात राहुन उच्च शिक्षण (Higher Education) घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा SC आणि ST वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र, आता राज्य सरकारने ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे. त्याचा शासन निर्णयही राज्य सरकारच्या वतीने आज जाहीर करण्यात आला आहे. 

हेही वाचा : CBSE Board : सीबीएसई 10 वीच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका देणार नाही : प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली  

राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची आजा नागपुरमध्ये ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली आहे. 


ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना कशी असणार आहे ? 

- मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 60 हजार रु मिळणार आहेत.

- संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये मिळणार आहेत. 

- जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रु मिळणार आहेत. 

- या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जाणार आहेत. राज्य भरात एकून 21 हजार 600 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्त दिला जाणार आहे.