१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत २८९ शिपाई पदांची भरती सुरू
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे शिपाई पदाच्या तब्बल २८९ रिक्त जागांवर सरळसेवेद्वारे भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे (PDCC Bank Recruitment) शिपाई (Peon Recruitment) पदाच्या तब्बल २८९ रिक्त जागांवर (289 Vacancies) सरळसेवेद्वारे भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध (Advertisement Published) करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pdcc.bank.in/careers किंवा https://www.punedccbank.com वर जाऊन अर्ज भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ (The deadline for applications is August 10) रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
अर्जासोबत १६५० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी व सर्व्हिस चार्ज इतके परीक्षा शुल्क ऑनलाईन जमा करणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान इयत्ता १२ वी किंवा समकक्ष पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे असून, PDCC बँकेत कंत्राटी तत्त्वावर सलग तीन वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. उमेदवार पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षांचा मूळ रहिवासी असणे आणि सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षालेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. अधिकृत वेबसाइट https://pdcc.bank.in/ वरून सविस्तर जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया पाहता येईल.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध राहणार असल्याने पात्र उमेदवारांनी संधी गमावू नये. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यांनीच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.