11th Admission : ११ वीच्या दुसर्या फेरीनंतरही ५० टक्के विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर
१४ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीत ५ लाख ७ हजार २८८ तर फेरीत २ लाख १५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. त्यानुसार फेरी एक व दोन मध्ये एकूण ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी (11th Online Admission Process) एकूण १४ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या फेरी अखेर ५ लाख ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले तर दुसर्या फेरी अखेर २ लाख १५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. त्यानुसार फेरी एक व दोन मध्ये एकूण ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित (Admission of 7 lakh 20 thousand 666 students confirmed) झाले आहेत तर ६ लाख ९९ हजार १४७ विद्यार्थी अद्याप (6 lakh 99 thousand 147 students out of college) प्रवेशापासून वंचित आहेत. त्यानुसार दुसर्या फेरी अखेर देखील सध्या घडीला ५० टक्के विद्यार्थी कॉलेजबाह्य (50 percent of students are out of college) असल्याचे समोर आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय मार्फत अकरावी प्रवेशासाठी १७ जुलै रोजी घोषित करण्यात आलेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट लेटर जाहीर करण्यात आले. मात्र, यातील १ लाख ७४ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. तर व्यवस्थापन, संस्था आणि अल्पसंख्यांक कोटा या अंतर्गत ४० हजार ८४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. एक एकूण २ लाख १५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
UGC NET : यूजीसी नेट जून २०२५ चा निकाल जाहीर..
तिसऱ्या नियमित फेरीसाठी यापुर्वीच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना २२ जुलै ते २३ जुलै या कालावधीत तिसऱ्या नियमित फेरी करिता प्रवेश अर्जाचा भाग-२ भरता येणार आहे. तसेच २६ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. असे असले तरी एकूण प्रवेशाच्या विद्यार्थी संख्येपेक्षा ५० टक्के विद्यार्थी अद्याप काॅलेजबाह्य असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे या उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश कधी निश्चित होणार आणि ते विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात कधी जाणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील ९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ३२ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १४ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीत ५ लाख ७ हजार २८८ तर फेरीत २ लाख १५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. त्यानुसार फेरी एक व दोन मध्ये एकूण ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
