तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळांची वेळ १०:३० पर्यंत,आदेश जारी

सध्या नागपूर शहरात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उष्णताजन्य आजारांचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन, थकवा आणि हिटस्ट्रोकचा मोठा धोका निर्माण झाला होता.

तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळांची वेळ १०:३० पर्यंत,आदेश जारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांची (Nagpur District Schools) वेळ आता सकाळी १०:३० पर्यंत मर्यादित (School limited until 10:30) करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच १०:३० पर्यंत सर्व बोर्डाच्या शाळा (Schools of All Boards) केवळ सकाळी ७:०० ते १०:३० या वेळेतच चालू राहतील. हा निर्णय तात्काळ लागू (Decision Effective Immediately) करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे.

सध्या नागपूर शहरात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उष्णताजन्य आजारांचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन, थकवा आणि हिटस्ट्रोकचा मोठा धोका निर्माण झाला होता. पालक आणि शिक्षक संघटनांकडून सातत्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला.

सर्व शाळा सकाळी ७:०० वाजता सुरू होऊन १०:३० वाजता संपतील. १०:३० नंतर कोणतेही शैक्षणिक किंवा उपक्रम चालणार नाहीत.
हा आदेश अंगणवाडी केंद्रे, खासगी शाळा आणि सरकारी शाळा सर्वांनाच लागू आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

काही पालकांनी पूर्ण सुट्टी जाहीर करण्याची किंवा ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, अचानक बदलामुळे शाळांना वेळापत्रक, परीक्षा आणि उपक्रमांचे नियोजन करण्यात अडचण येत आहे. शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत की, वर्गखोल्या छायांकित ठेवाव्यात, विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी आणि ओआरएस उपलब्ध करावे. पालकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की, मुलांना दुपारी १२ नंतर घराबाहेर पाठवू नये.