महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा तीन मित्रांनी केला खून; पैशासाठी अपहरण, मृतदेह शेतात पूरला 

कर्जबाजारी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी नऊ लाख रुपयांची खंडणी मागू नंतर खून करून तिचा मृतदेह सुप्या जवळील एका शेतात पुरल्याची माहिती पोलीस तपासानंतर समोर आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा तीन मित्रांनी केला खून; पैशासाठी अपहरण, मृतदेह शेतात पूरला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील वाघोली परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या उच्चशिक्षित विद्यार्थीनीचा तिच्याच महाविद्यालयामधील तीन मित्रांनी खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जबाजारी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी नऊ लाख रुपयांची खंडणी मागू नंतर खून करून तिचा मृतदेह सुप्या जवळील एका शेतात पुरल्याची माहिती पोलीस तपासानंतर समोर आली आहे. याप्रकरणी तीन संशयित तरुणांना विमान नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22 रा.स्टॅंझा लिव्हिंग, प्रिसो हाऊस,विमान नगर) अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. भाग्यश्री ही मुळची लातूरची असून वाघोली येथे बी.ई. कॉम्प्यूटर च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिच्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भाग्यश्री हिचे ३० मार्च रोजी पुणे अपहरण झाले होते.या प्रकरणी तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आरोपींनी भाग्यश्रीच्या पालकांच्या मोबाईलवर खंडणीसाठी एसएमएस पाठवला होता.त्यावर आरोपींनी दिलेल्या खात्यावर पालकांनी 50 हजार रक्कम पाठवली होती. मात्र अपहरण केलेल्या दिवशीच आरोपींनी तिचा खून केला होता. तसेच सुपा येथील एका शेतात तिचा मृतदेह पुरला होता. तांत्रिक विश्लेषणातील माहितीनुसार एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोन मित्रांच्या मदतीने अपहरण व खून करून केल्याची कबुली त्याने दिली आहे.

कर्जबाजारी झालेल्या तीन मित्रांनी पैशांची आवश्यकता असल्याने आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा खून केल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर प्रकरणी विमान नगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.