पीएसआय परीक्षेत राज्यात पहिली आलेल्या 'आश्विनी केदारी'चा दुर्दैवी मृत्यू
२८ ऑगस्ट रोजी पहाटे आश्विनी हिने अभ्यास करताना अंघोळीसाठी हिटरला पाणी तापवायला ठेवले होते. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सोडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. त्यानंतर तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय, पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या (Police Sub-Inspector Post) परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी घडलेल्या शाॅक अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज (Death of Ashwini Kedari) अखेर अपयशी ठरली.
वनराज आंदेकर गुन्ह्यातील आरोपीच्या मुलाची क्लासवरून परतताना गोळ्या घालून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे आश्विनी हिने अभ्यास करताना अंघोळीसाठी हिटरला पाणी तापवायला ठेवले होते. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सोडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. त्यानंतर तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय, पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने खेठ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी पुढाकार घेत तिला मदत केली होती. मात्र, सर्वांच्या प्रयत्नांनंतरही तिचे आयुष्य वाचवता आले नाही. अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न होते. त्या दिशेने ती प्रयत्नशील होती. परंतु दुर्दैवाने तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका आणि रपर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांत शोककळा परारली आहे.