मोठी बातमी : दहावी- बारावीचा पुरवणी परीक्षेचा पेपर ढकलला पुढे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचा निर्णय

राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे राज्य मंडळाने इयत्ता दहावी -बारावीचे २० जुलै रोजी घेतले जाणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतची माहिती कळवली आहे.

मोठी बातमी : दहावी- बारावीचा पुरवणी परीक्षेचा पेपर ढकलला पुढे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचा  निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education ) सध्या इयत्ता दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षा (10th-12th Supplementary Examination) घेतल्या जात आहेत. मात्र, राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (Heavy rain warning)  दिल्यामुळे राज्य मंडळाने इयत्ता दहावी -बारावीचे २० जुलै रोजी घेतले जाणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतची माहिती कळवली आहे.

हेही वाचा : शिक्षण EduVarta Impact : बालभारतीच्या डोमेन विक्रीचा मुद्दा थेट विधानसभेत, वर्षा गायकवाड आक्रमक

राज्य मंडळातर्फे जुलै ऑगस्ट महिन्यात घेतली जाणारी इयत्ता दहावी -बारावीची परीक्षा १८ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. परंतु राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाने मुंबई ,रायगड आदी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळांने  20 जुलै रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.आता पुढे ढकळलेला दहावीचा पेपर २  ऑगस्ट रोजी तर बारावीचा पेपर ११  ऑगस्ट रोजी होणार आहे. 

राज्य मंडळांने  प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार २० जुलै रोजी इयत्ता बारावीचा मराठी व इतर भाषा विषयांचा पेपर आहे. तर इयत्ता दहावीचा मल्टी स्किल, बेसिक टेक्नॉलॉजी आधी विषयांची परीक्षा आहे. परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे २० जुलै रोजी होणारे इयत्ता दहावी बारावीचे पेपर आता ऑगस्ट महिन्यात घेतले जाणार आहेत. राज्यातील पूर परिस्थिती विचारात घेऊन राज्य मंडळांनी २० जुलै रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.