महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा निकालात मोठी घट; दहावी २९.५३ टक्के, बारावी ३८.७२ टक्के निकाल

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५२ हजार ८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा निकाल २९.५३ टक्के लागला, तर गेल्या वर्षी तो ३६.४८ टक्के होता. यात ६.९५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. बारावीच्या पुरवणी परीक्षेतही गेल्या वर्षीच्या ४३.६५ टक्क्यांच्या तुलनेत ४.९३ टक्क्यांची घट झाली.

महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा निकालात मोठी घट; दहावी २९.५३ टक्के, बारावी ३८.७२ टक्के निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Board of Secondary and Higher Secondary Education) घेतलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे (10th and 12th Supplementary Examinations) निकाल जाहीर (Supplementary exam results declared) करण्यात आले आहेत. दहावीचा निकाल २९.५३ टक्के तर बारावीचा निकाल ३८.७२ टक्के (10th 29.53% result, 12th 38.72% result) लागला आहे. यामध्ये दहावीचे १५ हजार १५७ विद्यार्थी आणि बारावीचे ३९ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही निकालात लक्षणीय घट (Significant decrease in results) झाल्याचे समोर आले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल जाहीर केला. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५२ हजार ८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा निकाल २९.५३ टक्के लागला, तर गेल्या वर्षी तो ३६.४८ टक्के होता. यात ६.९५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. बारावीच्या पुरवणी परीक्षेतही गेल्या वर्षीच्या ४३.६५ टक्क्यांच्या तुलनेत ४.९३ टक्क्यांची घट झाली.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३७ हजार ९२४ मुलगे आणि १४ हजार ९५६ मुलींनी नोंदणी केली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १० हजार २२४ मुलगे तर ४ हजार ९३३ मुली आहेत. मुलींचा उत्तीर्णता दर ३४.६ टक्के असून मुलांचा २७.७५ टक्के आहे. १८ हजार ४८२ विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अयशस्वी ठरल्याने ते एटीकेटीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अकरावीला एटीकेटी सवलतीद्वारे प्रवेश घेता येणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १ लाख ३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात कला, विज्ञान, वाणिज्य, एमसीव्हीसी आणि आयटीआय शाखांचा समावेश होता. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ६४.९५ टक्के लागला, तर कला शाखेचा २१.४० टक्के, वाणिज्य शाखेचा २२.४० टक्के लागला. विभागनिहाय निकालात दहावीत नाशिक विभागाने ४१.४५ टक्क्यांसह आघाडी घेतली, तर बारावीत छत्रपती संभाजीनगर विभागाने ५२.९० टक्क्यांसह सर्वोच्च स्थान मिळवले. कोकण विभाग दोन्ही परीक्षांत सर्वात कमी निकालासह तळाला राहिला.

निकालात समाधान नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १५ ते २४ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत अर्ज करणे आवश्यक आहे.

पुरवणी परीक्षेच्या निकालात झालेली घट ही चिंतेची बाब असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धती, मूल्यमापन प्रक्रिया आणि शिक्षण गुणवत्तेवर चर्चा सुरू झाली आहे. राज्य मंडळाने निकाल सुधारण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.