'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर  राष्ट्रीय निबंध स्पर्धा ; हजारो रुपयांचे बक्षीस 

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 'ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरुद्ध भारताचे नवीन धोरण' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत आयोजित केली जाईल आणि यामध्ये सहभागी ५०० ते ६०० शब्दांचा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहू शकतात.

'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर  राष्ट्रीय निबंध स्पर्धा ; हजारो रुपयांचे बक्षीस 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अलिकडेच, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत कारवाई करत  पीओके आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. संपूर्ण देशासाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला होता. या विषयावर  भारताच्या संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय निबंध स्पर्धा आयोजित  केली आहे. (National Essay Competition on 'Operation Sindoor')
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 'ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरुद्ध भारताचे नवीन धोरण' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धा जाहीर केली आहे. ही स्पर्धा १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत आयोजित केली जाईल आणि यामध्ये सहभागी ५०० ते ६०० शब्दांचा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहू शकतात. MyGov पोर्टल www.mygov.in द्वारे या स्पर्धेत भाग घेता येईल. इच्छुक उमेदवार  या वेबसाइट वर त्यांचे निबंध जमा करू शकतील. 
टॉप 3 विजेत्यांना 10,000 रुपयांचे रोख बक्षीस आणि स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी विशेष आमंत्रण मिळेल. टॉप 200 सहभागींना ई-निमंत्रण पत्र मिळेल, ज्यामुळे ते दिल्लीतील लाल किल्ल्याला भेट देऊ शकतील आणि 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होऊ शकतील.
 MyGov पोर्टलवर या स्पर्धेविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.