हिजाब काढायला सांगितल्याने दहावीच्या विद्यार्थिनींनी दिली नाही परीक्षा 

असा आरोप आहे की जेव्हा विद्यार्थिनी हिजाब घालून तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांना तपासणाऱ्या शिक्षकांनी त्यांना हिजाब काढण्यास सांगितले. विद्यार्थिनींनी याचा विरोध  केला आणि त्यांचा हिजाब काढण्यास नकार दिला. प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना कळवले आणि परीक्षा न देता घरी परतल्या.

हिजाब काढायला सांगितल्याने दहावीच्या विद्यार्थिनींनी दिली नाही परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नीट, जेईई, यूपीएससी इत्यादी प्रमुख परीक्षांमध्ये हिजाबबाबत देशात सुरू असलेला वाद बोर्डाच्या परीक्षेतही सुरूच आहे. सोमवारी, यूपी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी, सर्वोदय इंटर कॉलेज खुदौली परीक्षा केंद्रावर (Sarvodaya Inter College Khudauli Examination Center) दहा विद्यार्थिनींना हिजाब काढण्यास सांगितल्यानंतर त्या परीक्षा न देता निघून गेल्या. (Ten female students left the exam without taking it after being asked to remove their hijabs)

मीडिया रिपोर्टनुसार सकाळी, मॉडर्न कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनींनी खुदौली येथील सर्वोदय इंटर कॉलेज परीक्षा केंद्रावर हिंदी परीक्षा देण्यासाठी पोहोचल्या. मुख्य गेटवर तपासणी केल्यानंतर उमेदवारांना आत पाठवले जात होते. असा आरोप आहे की, जेव्हा विद्यार्थिनी हिजाब घालून तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांना तपासणाऱ्या शिक्षकांनी त्यांना हिजाब काढण्यास सांगितले. विद्यार्थिनींनी याचा विरोध केला आणि त्यांचा हिजाब काढण्यास नकार दिला. प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना कळवले आणि परीक्षा न देता घरी परतल्या. ओळख पटविण्यासाठी चेहरा खुला असतानाही हिजाब काढण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हिजाब न काढल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. यामुळे दहा मुली परीक्षेपासून वंचित राहिल्या, असा आरोप ही शाळा प्रशासनावर केला जात आहे. 

दरम्यान, सर्वोदय इंटर कॉलेज परीक्षा केंद्राचे प्रशासक दिनेश कुमार गुप्ता यांनी हिजाब काढण्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले  आहे. त्यांनी  सांगितले की त्या मुलींना कोणीही हिजाब काढण्यास सांगितले नव्हते.परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रशासकाला असा अधिकार आहे की, जर काही शंका असेल तर तो महिला पोलिस अधिकारी किंवा महिला शिक्षिकेकडून विद्यार्थिनींचा हिजाब काढू शकतो.  हिजाब काढण्याबाबत  कोणीही नियंत्रण कक्षाकडे किंवा माझ्याकडे वैयक्तिकरित्या तक्रार केलेली नाही. या संदर्भात तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हा शाळा निरीक्षक राकेश कुमार यांनी दिली आहे.