नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांना सीबीएसईचा इशारा
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ४४ लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षेत सहभागी होणार आहेत. सीबीएसई एकूण २०४ विषयांसाठी परीक्षा घेईल. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education) सीबीएसई 10 वी, 12 वीच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. मंडळाकडून परीक्षांच्या निष्पक्ष संचालनासाठीची तयारी अंतिम टप्यात पोहोचली आहे. याचाच एक भाग म्हणून आता बोर्डाने संलग्न शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. (The board has issued guidelines for affiliated schools and students) सीबीएसईने शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षांच्या निष्पक्ष संचालनासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा दिला आहे. जर कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांना २ वर्षांच्या बंदीसह गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, (If found violating the rules, they will face serious consequences, including a 2-year ban) असा इशारा बोर्डाने दिला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ४४ लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षेत सहभागी होणार आहेत. सीबीएसई एकूण २०४ विषयांसाठी परीक्षा घेईल. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत.
बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निष्पक्ष परीक्षा आयोजित करणे आवश्यक आहे यावर तुम्ही सहमत असाल. त्यानुसार, सीबीएसईने एक सविस्तर "अन्याय्य साधन नियम" तयार केला आहे. शिक्षकांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्यांना परीक्षेच्या नीतिमत्तेबद्दल, नियमांबद्दल आणि सीबीएसईने जारी केलेल्या सूचनांबद्दल माहिती द्यावी. तुमच्या विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवा आणि त्यांना परीक्षांच्या आयोजनाबद्दल जागरूक करा. परीक्षा केंद्रात अनुचित पद्धतींना प्रतिबंध करण्याबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करा."
शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बनवलेले नियम आणि उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाची संपूर्ण माहिती द्यावी. परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीच्या नियमांची जाणीव करून द्या. विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शक तत्त्वे आणि शिक्षेबद्दल माहिती द्या. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वस्तू वापरू नका असे शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.