एमपीएससीचा नवा विक्रम! परीक्षेनंतर अवघ्या २४ तासांत उत्तरतालिका जाहीर; हरकतींसाठी ६ जूनपर्यंत मुदत

या परीक्षेच्या पेपर १ (सामान्य अध्ययन) आणि पेपर २ (CSAT) दोन्हीची उत्तरतालिका उमेदवारांच्या सोयीसाठी तत्काळ प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षेनंतर दुसऱ्याच दिवशी उत्तरतालिका जाहीर होणे हे उमेदवारांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे.

एमपीएससीचा नवा विक्रम! परीक्षेनंतर अवघ्या २४ तासांत उत्तरतालिका जाहीर; हरकतींसाठी ६ जूनपर्यंत मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) इतिहासात प्रथमच परीक्षा झाल्यानंतर केवळ २४ तासांत प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध (First answer sheet published) करून परीक्षा प्रक्रियेला वेग देण्याचा नवा विक्रम प्रस्थापित (New Record Established) केला आहे. आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ (Group A and Group B Joint Preliminary Examination – 2026) या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपुत्रिकेच्या चारही संचांची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. तसेच हरकती नोंदवण्यासाठी (Registering Objections) ६ जूनपर्यंत मुदत (Deadline June 6) देण्यात आली आहे. 

या परीक्षेच्या पेपर १ (सामान्य अध्ययन) आणि पेपर २ (CSAT) दोन्हीची उत्तरतालिका उमेदवारांच्या सोयीसाठी तत्काळ प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षेनंतर दुसऱ्याच दिवशी उत्तरतालिका जाहीर होणे हे उमेदवारांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आयोगाच्या या सुधारलेल्या कार्यशैलीचे कौतुक व्यक्त केले आहे. “अखेर एमपीएससीने गती घेतली,” असे प्रतिक्रिया येत आहेत.

यापूर्वी एमपीएससीच्या विविध परीक्षा व निकाल लांबत असल्याने आयोगावर सातत्याने टीका होत होती. महिनो-महिने उत्तरतालिका न मिळाल्याने उमेदवारांच्या तयारीवर परिणाम होत होता. मात्र, आता राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा व निकाल प्रक्रियेला गती देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. यासाठी सुसूत्रित कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्याचा पहिला सकारात्मक परिणाम या पूर्व परीक्षेत दिसून आला आहे. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेतृत्वाखालील टीमने यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सूत्रांकडून समजते.

उत्तरतालिकेवर हरकती नोंदवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने ६ जून २०२६ पर्यंत मुदत दिली आहे. हरकती केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जाणार असून, विहित शुल्क भरूनच हरकत नोंदवणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mpsc.gov.in) लॉगिन करून हरकत सादर करावी. ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. आयोगाने स्पष्ट केले की, मुदत संपल्यानंतर कोणत्याही हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.