जुन्या भाषांना नवा जन्म : पाली, अवेस्ता, प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी संशोधन करू

मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रामुख्याने अवेस्ता-पहलवी, पाली आणि प्राकृत या प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान भाषांवर भर दिला जाणार आहे. या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन हे या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या प्रस्तावित केंद्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने विद्यापीठात ‘हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चर’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

जुन्या भाषांना नवा जन्म : पाली, अवेस्ता, प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी संशोधन करू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

प्राचीन भाषेच्या संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पाली,  अवेस्ता-पहलवी, प्राकृत (Pali, Avesta-Pahlavi, Prakrit languages) यांसारख्या प्राचीन भाषांना पुर्नजन्म होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई विद्यापीठात ‘सेंटर ऑफ एक्सलेंस इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टी- कल्चरल स्टडीज’ची स्थापना (Establishment of Center of Excellence in Heritage Languages and Multi-Cultural Studies) केली जात आहे. भारतातील लुप्त होत चाललेल्या समृद्ध व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या संशोधन, संवर्धन आणि प्रचारासाठी या केंद्राचे महत्व अधोरेखित होणार आहे.

मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रामुख्याने अवेस्ता-पहलवी, पाली आणि प्राकृत या प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान भाषांवर भर दिला जाणार आहे. या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन हे या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या प्रस्तावित केंद्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने विद्यापीठात ‘हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चर’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

पेपरफुटी कायदा : खासगी विधेयक सभागृहात मांडले, लाखो उमेदवारांना मिळणार न्याय

भारताला एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषिक वारसा लाभला आहे. या प्राचीन आणि ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन करून शाश्वतेच्या दृष्टीने विचार व्हावा यासाठी मुंबई विद्यापीठात हे केंद्र स्थापन केले जात आहे. हे केंद्र केवळ एक शैक्षणिक प्रकल्प न राहता, भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रभावी माध्यम ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हे प्रस्तावित केंद्र ‘युगे युगेन भारत’, ‘ज्ञान भारतम्’ आणि ‘भारतीय भाषा संवर्धन योजना’ यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी समन्वय साधून कार्य करणार असून, हे केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत संशोधन, अभ्यासक्रम विकास, क्षेत्रीय सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून भारतीय भाषांचा जागर घडवणार असल्याचेही यावेळी कुलगुरू कुलकर्णी त्यांनी सांगितले.