मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्र २०२६ परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ mu.ac.in वर सुधारित वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे MHT CET आणि ग्रामपंचायत निवडणुकींमुळे प्रभावित झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्र २०२६ परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ग्रामपंचायत निवडणुका आणि महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (Elections and Entrance Exams) यांमुळे मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) उन्हाळी सत्र २०२६ च्या (Summer Session Examination) काही परीक्षांचे दुसऱ्यांदा सुधारित वेळापत्रक जाहीर (Revised Schedule Announced) केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (Examination Board) विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार नवीन तारखा निश्चित केल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळा आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षा आता २ मे, ६ मे, ११ मे, १४ मे आणि १५ मे २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या वेळा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

विद्यापीठाने १८ एप्रिल २०२६ रोजी प्रथम वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार सहा परीक्षा २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या परीक्षा ९ मे रोजी ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक विद्यार्थी MHT CET परीक्षा देणार असल्याने तारखांमध्ये अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली. CET देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा वेळापत्रक सुधारित केले आहे.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागप्रमुख, ठाणे व कल्याण उपकेंद्र संचालक, दूरस्थ शिक्षण विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना तातडीने नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना नियोजन करण्यास मदत होईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ mu.ac.in वर सुधारित वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे MHT CET आणि ग्रामपंचायत निवडणुकींमुळे प्रभावित झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत दोन वेळा वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.