रेणुका स्वरूप हायस्कूलमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर प्रेरणादायी व्याख्यान
पन्हाळगड ते पावनखिंड (घोडखिंड) या ऐतिहासिक प्रवासाचा आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय शौर्य, त्याग, स्वराज्यनिष्ठा व कर्तव्यपरायणतेचा इतिहास त्यांनी अत्यंत रोचक, रंजक आणि सोप्या भाषेत उलगडून सांगितला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल येथे गुरुवारी (दि. 23) 2026 स्वराज्याचे शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमावर आधारित प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी इतिहास अभ्यासक व व्याख्याते मोहन शेटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपमुख्याध्यापक शेखर जाधव, पर्यवेक्षक मनोज अनासपुरे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे मोहन शेटे यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि स्वराज्य निर्मितीचा इतिहास विद्यार्थिनींसमोर जिवंत केला. विशेषतः पन्हाळगड ते पावनखिंड (घोडखिंड) या ऐतिहासिक प्रवासाचा आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय शौर्य, त्याग, स्वराज्यनिष्ठा व कर्तव्यपरायणतेचा इतिहास त्यांनी अत्यंत रोचक, रंजक आणि सोप्या भाषेत उलगडून सांगितला.
व्याख्यानातून विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रप्रेम, स्वराज्यनिष्ठा, त्याग आणि कर्तव्यभावना जागृत करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. व्याख्यानादरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून उपस्थित सर्वजण इतिहासाच्या या प्रेरणादायी प्रवासाने भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. तसेच विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.