बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट! बीडच्या चौसाळा केंद्रावर घडला धक्कादायक प्रकार
आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच पेपरला हा प्रकार समोर आला आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील बीडच्या चौसाळा येथे असलेल्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Board of Higher Secondary Education) आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेण्यात येत आहेत. राज्यभरात 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात (Examination malpractices exposed) आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या चौसाळा केंद्रावर (At Chausala center in Beed) समोर आला आहे. चक्क परीक्षा केंद्राच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video of providing copies goes viral) झाला आहे.
हेही वाचा - शिक्षक- शिक्षकेतर समायोजन थांबवा;मुख्याध्यापक महामंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच पेपरला हा प्रकार समोर आला आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. तरी, देखील बीडच्या चौसाळा येथे असलेल्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज बारावीचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी बाहेरून कॉप्या करू नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मात्र, कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूने विद्यार्थी जीव धोक्यात घालून इमारतीवर चढून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे काॅपी करण्यापासून विद्यार्थ्यांना कसे रोखावे हा चिंतेचा प्रश्न शिक्षण विभागापुढे उभा राहिला आहे.
बारावी बोर्ड परीक्षेसाठी 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्र असून त्यातील 172 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या 172 परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबादली करून त्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहे. यंदा राज्यातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे 25 हजाराने वाढ झाली आहे.