विद्यार्थ्यांना वर्गात अपमानित करणे योग्य नाही; शिक्षकांनी संवेदनशील वागणूक ठेवावी : सर्वोच्च न्यायालय

”न्यायमूर्ती मेहता यांनी पुढे स्पष्ट केले की, वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान करणे हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम करणारा प्रकार आहे. अशा वर्तनाला स्वीकारार्ह मानता येणार नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

विद्यार्थ्यांना वर्गात अपमानित करणे योग्य नाही; शिक्षकांनी संवेदनशील वागणूक ठेवावी : सर्वोच्च न्यायालय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्याच्या आत्महत्येशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्षकांच्या वर्तनाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना वर्गात सर्वांसमोर अपमानित (Students should not be humiliated) करणे योग्य नसून, अशा वागणुकीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम (Impact on mental health) होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि सन्मान यांचा समतोल राखण्याची गरज (The need to maintain balance) व्यक्त केली.

हे प्रकरण एका प्राध्यापकाने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. प्राध्यापकांच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. एस. नायडू यांनी युक्तिवाद केला की, विद्यार्थ्याला कथित अपमान महिनाभर आधी झाला होता. त्यामुळे त्याला आत्महत्येचे थेट कारण मानता येणार नाही. विद्यार्थ्याने मोबाईल अॅपद्वारे कर्ज घेतल्याने कर्ज वसुली एजंटांकडून होणारा सतत त्रास हा मुख्य कारणीभूत असल्याचा दावा वकिलांनी केला.

वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते. प्रत्येक छोट्या घटनेत फौजदारी कारवाई झाल्यास शिस्त राखण्यात अडचण येऊ शकते. मात्र, न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ते म्हणाले, “काळ बदलला आहे. आमच्या काळात शिक्षकांकडून मार किंवा कठोर वागणूक सामान्य मानली जात होती, पण आता परिस्थिती वेगळी आहे.

”न्यायमूर्ती मेहता यांनी पुढे स्पष्ट केले की, वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान करणे हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम करणारा प्रकार आहे. अशा वर्तनाला स्वीकारार्ह मानता येणार नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठी शिक्षक, संस्था आणि पालकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार असून, न्यायालय शिक्षण क्षेत्रातील शिस्त आणि संवेदनशीलता यांचा समतोल कसा राखला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.