शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; उद्धव ठाकरेंचा २० जुलैच्या संसद मोर्चाला पाठिंबा

सोनम वांगचूक गेल्या १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांचे ८ किलोहून अधिक वजन कमी झाले असून, सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मी स्वतः त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. देशाला त्यांच्या सारख्या सुशिक्षित आणि समर्पित व्यक्तींची गरज आहे, असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; उद्धव ठाकरेंचा २० जुलैच्या संसद मोर्चाला पाठिंबा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी (Demand for resignation) करणाऱ्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठिंबा जाहीर (Support announced) केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक (Education expert Sonam Wangchuk) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले. २० जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला (Morcha to Parliament on July 20) त्यांनी पाठिंबा दिला असून, शक्य झाल्यास स्वतः उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली.

सोनम वांगचूक गेल्या १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांचे ८ किलोहून अधिक वजन कमी झाले असून, सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मी स्वतः त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. देशाला त्यांच्या सारख्या सुशिक्षित आणि समर्पित व्यक्तींची गरज आहे, असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

शिक्षण क्षेत्रातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित हा विषय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या धोरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सर्वपक्षीयांनी २० जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मात्र, कोणीही राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन जाऊ नये, असे स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांचा लढा देशातील युवकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

पालक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे ठाकरे यांनी म्हटले. दिल्लीत आंदोलन करणारे युवक सुशिक्षित असून, हा विषय देशाच्या भविष्याशी संबंधित आहे. २० जुलैच्या मोर्चापूर्वी जंतर-मंतरवर हिंसाचार घडवून आंदोलन उधळून लावण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही अभिजीत दिपके यांच्याकडून करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रात सध्या व्याप्त असलेल्या समस्या, परीक्षा प्रणाली, अभ्यासक्रम आणि तरुणांच्या भवितव्याशी निगडित मुद्द्यांवर हा मोर्चा केंद्रित असल्याने शिक्षण तज्ज्ञ आणि विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाकडे लक्ष वळवले आहे. २० जुलैला दिल्लीत होणाऱ्या मोर्चाकडे देशभरातील शैक्षणिक वर्तुळांचे लक्ष लागले आहे.