शाळेच्या उपहारगृहांवर तुकाराम मुंढे यांची करडी नजर; शालेय पोषण आहार योजनेची तपासणी सुरू
शालेय स्तरावर स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अन्न आणि औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) आयुक्त तुकाराम मुंढे (Commissioner Tukaram Mundhe) यांनी भेसळीविरोधातील कारवाईनंतर (Action against adulteration) आता शाळांच्या उपहारगृहांवर आणि मध्यान्ह भोजन योजनेवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतील खासगी शाळांमधील उपहारगृहे आणि मध्यान्ह भोजन पुरवठा करणाऱ्या किचन शेड्सची तपासणी (Inspection of the school nutrition meal) सुरू करण्यात आली आहे.अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुख्याध्यापक, बचत गट आणि शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अन्न सुरक्षा पाळण्याचे कठोर निर्देश (Food safety guidelines) देण्यात आले.
मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियम २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. शालेय स्तरावर स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
मध्यान्ह भोजन योजनेत पूर्वी आळ्या, मेलेली माल आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. उपहारगृहांमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जात नसल्याचे प्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर आता एफडीएने सक्रिय भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे संदेश विभागाने दिला आहे.
गेल्या आठवड्यात शाळा परिसरात स्टिंग पेयावर बंदी घालण्यात आली. आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सरकारने ५०० मीटर परिसरात विक्रीस बंदी घातली. तरीही काही ठिकाणी अशा पेयांची विक्री सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. एफडीए आता या सर्व बाबींवर कडक नजर ठेवणार आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीए विभागाने दूध भेसळ, मिठाई आणि इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यामुळे राज्यातील दूध उत्पादनात २५ टक्क्यांची घट झाली. आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष वळवल्याने पालक आणि शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.अन्न आणि औषध प्रशासन विभाग लवकरच राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवणार असल्याचे समोर आले आहे.