देशात आजही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करा - डॉ. निलम गोर्हे
वसुधैव कुटुम्ब कमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
समाजाचे कल्याण साधण्यासाठी राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात. हा धागा सर्वांना जोडणार आहे. मानवाधिकार संदर्भात माहिती घ्यावी. देशात आजही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे (Maharashtra Legislative Council Deputy Chairman Dr. Nilam Gorhe) यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या (MIT World Peace University's MIT School of Government) वतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) (Masters in Political Leadership and Government) २० व्या बॅचच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गोर्हे म्हणून बोलत होत्या.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, "सरकार आणि प्रशासन समजावून घ्या, न्याय संस्था, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवा, ऐकण्याची सवय ठेवा आणि लेजिलेटीव्ह टुल्स हे गुण अंगीकारा. राजकारणात उतरल्यावर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि जीवनासंदर्भातील अधिकार व आत्मविश्वास मिळतो. बदलत्या राजकारणामुळे खाजगी आणि सार्वजनीक जीवन राहिलेले नाही याचे भान ठेवावे."
'सेवा परमोधर्म’ (Seva Paramodharma) हे सूत्र लक्षात ठेऊन राजकारणाच्या मैदानात उतरावे. जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडवता येतात. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल.” असे मत पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान (Punjab Legislative Assembly Speaker Kultar Singh Sandhawan) यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड (Founder President of MIT World Peace University Prof. Dr. Vishwanath Karad) होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नॅशनल लॅजिलेटिव्ह कॉन्फरन्सच्या कॉपी टेबल बुकचे (Copy Table Book of the National Legislative Conference) प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले
यावेळी बोलताना कुलतार सिंह संधवान म्हणाले," समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येताना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी. विचार आणि तलवाराने इतिहास लिहिला जातो. या देशात विविध धर्मांचे लोक असल्याने धर्म विरोधक गोष्टींना कधीही वाव देऊ नका. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे पास होतात त्यावर चर्चा विमर्श होत नाही. त्यामुळे असे आमदार आणि खासदार निर्माण व्हावे जे यावर बोलतील.”
डॉ.सी.पी जोशी म्हणाले, येथील उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत सुधारणेची अपेक्षा आहे. समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणी मंडळींने काम करायला हवे. त्याचनुसार प्रत्येक युवकांमधील स्कीलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. आता राजकारण क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले," भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्व दयावे. वसुधैव कुटुम्ब कमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,"राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. देशाची वाढती लोकसंख्या संदर्भात कोणतीही पार्टी विचार करत नाही. अशा वेळेस राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधरण्यास वेळ लागणार नाही. त्याच प्रमाणे देशातील कोणत्याही निवडणुकीच्या १ वर्षापूर्वी कोणतीही योजना घोषित करू नये. त्याचप्रमाणे हा पाठ्यक्रम देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेत सुरू करण्याची गरज आहे.”
यावेळी राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी.पी.जोशी (Former Speaker of Rajasthan Legislative Assembly Dr. CP Joshi) व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे विशेष अतिथी तर एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड (Rahul Karad, Founder of MIT School of Government and Executive Chairman of WPU), कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी, डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.डॉ. गौतम बापट आदी मान्यवर उपस्थित होते.