विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थी परिषदेचे आंदोलन 

विद्यार्थ्यांच्या वतीने सध्या असे सांगण्यात आले आहे की, प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत विद्यार्थ्यांना गोल्फ क्लब, येरवडा येथून विश्रांतवाडी येथील नव्या जागी स्थलांतर करण्यास सांगितले आहे, जेथे मुलींसाठी नवीन वसतिगृह सुरू होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर मोठे नुकसान होणार असल्याने यावर काही अक्षेप घेण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थी परिषदेचे आंदोलन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (Dr. Babasaheb Ambedkar Hostel) (गोल्फ क्लब, येरवडा) तसेच गुणवंत मुलांचे वसतिगृह (Boys' hostel) (नवीन, येरवडा) येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांकडून मागील ३० तासांपासून आंदोलन (Student movement) करण्यात येत आहे. त्यांच्या या आंदोनलात आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) उडी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता तीव्र स्वरुप प्राप्त झाले आहे.  

विद्यार्थ्यांच्या वतीने सध्या असे सांगण्यात आले आहे की, प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत विद्यार्थ्यांना गोल्फ क्लब, येरवडा येथून विश्रांतवाडी येथील नव्या जागी स्थलांतर करण्यास सांगितले आहे, जेथे मुलींसाठी नवीन वसतिगृह सुरू होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर मोठे नुकसान होणार असल्याने यावर काही अक्षेप घेण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मुख्य आक्षेप - 

नवीन ठिकाणी वसतिगृह एकत्रित असल्याने १००० विद्यार्थ्यांचे एकत्र वास्तव्य अपेक्षित आहे, ज्यामुळे अभ्यास, आहार व सुविधा यावर परिणाम होईल.  विश्रांतवाडी हे ठिकाण मेट्रोपासून दूर असून प्रवासाची गरज वाढल्यामुळे वेळ आणि खर्चात वाढ होईल, आणि त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक त्रास संभवतो. गोल्फ क्लब वसतिगृहामध्ये अभ्यासिका, जीम, बाग, विद्युत रोषणाई, खेळांची साधने अशा विविध सुविधा उपलब्ध असून नवीन ठिकाणी त्या उपलब्ध नसल्याचे असल्याचे अक्षेप विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. 

प्रशासनाने निर्णय परत घ्यावा आणि पूर्ववत वसतिगृहातच विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण आणि भविष्य अबाधित राहील, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे