विद्यापीठाला उत्कृष्ट बनवण्यासाठी कुलगुरू, प्राध्यापकांचे योगदान महत्त्वाचे - सरन्यायाधीश भूषण गवई

महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत. माझ्या कार्यकाळात या विश्वविद्यालयाची सुरुवात झाली आणि आता सरन्यायाधीश म्हणून माझ्याच हस्ते पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन झाले, याचा मला अभिमान आहे असेही ते म्हणाले.

विद्यापीठाला उत्कृष्ट बनवण्यासाठी कुलगुरू, प्राध्यापकांचे योगदान महत्त्वाचे - सरन्यायाधीश भूषण गवई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकार विद्यापीठांना पायाभूत सुविधा, चांगली इमारत आणि उत्तम वातावरणासाठी निधी देत असते (The government provides funds to universities for infrastructure, good buildings and a good environment.) पण शैक्षणिक उत्कृष्टता टिकवून ठेवण्यासाठी (maintain academic excellence) कुलगुरू आणि प्राध्यापक (Vice-Chancellor and Professor) महत्वाची भूमिका पार पडत असतात. त्यामुळे विद्यापीठांसाठी त्यांचे योगदान आणि समर्पण आवश्यक आहे असे मत सरन्यायाधीश आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे कुलपती भूषण गवई (Chief Justice and Chancellor of Maharashtra National Law University, Nagpur Bhushan Gavai) यांनी व्यक्त केले आहे.

वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (एमएनएलयू) प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन आणि ई-ग्रंथालयाचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश प्रसन्ना वराळे, न्यायाधीश अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे, राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजेंद्र कुमार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत. माझ्या कार्यकाळात या विश्वविद्यालयाची सुरुवात झाली आणि आता सरन्यायाधीश म्हणून माझ्याच हस्ते पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन झाले, याचा मला अभिमान आहे असेही ते म्हणाले.