शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ जुलैपासून राज्यव्यापी शोधमोहिम

या मोहिमेचा उद्देश मुलांना पुन्हा शाळेशी जोडणे हा असून, केवळ आकडेवारी नव्हे, तर वास्तवाशी जोडलेले शैक्षणिक समावेशन साधणे हे तिचे मुख्य ध्येय आहे. मोहिमेची व्याप्ती शाळांपुरती मर्यादित न राहता हॉटेल, बसस्थानके, नव्याने विकसित वसाहती, हमाली श्रमिक वस्त्या, झोपडपट्टया यांच्यावर केंद्रित असणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ जुलैपासून राज्यव्यापी शोधमोहिम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यभरातील लाखो शाळाबाह्य मुलांना (Out-of-school student) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना आखल्या जातात. त्या अनुषंगाने ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांसाठी शिक्षण विभागाकडून (Department of Education) १ जुलैपासून शोधमोहिम (Student search campaign) सुरू करण्यात येणार आहे. १ जुलै ते १५ जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत राज्यातील गावखेड्यात, वाडी, वस्तीमध्ये जाऊन या शाळाबाह्य, अपूर्ण शिक्षण घेणारी, स्थलांतरित मुले शोधण्याचे काम केले जाणार आहे. 

या मोहिमेचा उद्देश मुलांना पुन्हा शाळेशी जोडणे हा असून, केवळ आकडेवारी नव्हे, तर वास्तवाशी जोडलेले शैक्षणिक समावेशन साधणे हे तिचे मुख्य ध्येय आहे. मोहिमेची व्याप्ती शाळांपुरती मर्यादित न राहता हॉटेल, बसस्थानके, नव्याने विकसित वसाहती, हमाली श्रमिक वस्त्या, झोपडपट्टया यांच्यावर केंद्रित असणार आहे.

स्थलांतरित अथवा रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेशी जोडणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरी व ग्रामीण भागात समांतरपणे ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. 'शाळाबाहा विद्यार्थी शोध मोहीम' ही केवळ कागदोपत्री न राहता, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा पाया भक्कम करणारी कृती ठरेल, अशी अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन आणि कृतिशील सहभाग दाखवला, तर ही शोधमोहिम पुर्णत्त्वास जाईल अन्यथा केवळ कागदावरच राहिल.