सोशल मीडियावर 'वन मॅन शो' स्टेटस, अन् घोडेगाव आयटीआय वसतिगृहात विद्यार्थ्याचा निर्घृण खून 

आयटीआयसारख्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकतात. दूरदूरवरून येणारे विद्यार्थी वसतिगृहांवर अवलंबून असतात. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्रीच्या गस्तीची व्यवस्था अपुरी असते.

सोशल मीडियावर 'वन मॅन शो' स्टेटस, अन् घोडेगाव आयटीआय वसतिगृहात विद्यार्थ्याचा निर्घृण खून 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) घोडेगाव येथील वसतिगृहात (Ghodegaon Hostel) झालेल्या एका निर्घृण खूनाच्या घटनेने शैक्षणिक वातावरणात खळबळ उडवली आहे. गोनवडी येथील आयटीआय मुलांच्या (ITI Student) वसतिगृहातील टेरेसवर झोपलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा डोक्यात लोखंडी पाईप आणि सिमेंट गट्ट्याने वार करून खून (Murder of a student) करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर (Social media) ‘वन मॅन शो कसा ठोकला’ अशा आशयाचे स्टेटस टाकून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. मृत विद्यार्थी सौरभ संतोष साखरे (Student Saurabh Sakhare) (१९) हा आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आरोपी अमय भिका कोकरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणातून आणि अनिरुद्ध साखरे यांच्याशी झालेल्या वादातून आरोपीने हा राग मनात धरला होता. झोपेत असलेल्या सौरभवर अचानक हल्ला करण्यात आला आणि तो जागीच मृत्यू पावला. ही घटना केवळ एक वैयक्तिक वैमनस्य नव्हती, तर शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृह सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि सोशल मीडियाच्या दुरुपयोगाची गंभीर समस्या अधोरेखित करते. 

आयटीआयसारख्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकतात. दूरदूरवरून येणारे विद्यार्थी वसतिगृहांवर अवलंबून असतात. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्रीच्या गस्तीची व्यवस्था अपुरी असते. रात्रीची टेरेसवर झोपण्याची सक्ती किंवा परवानगी यासारख्या अनियमित गोष्टींमुळे अशा घटनांना निमंत्रण मिळते.

शिक्षण क्षेत्रात ही घटना केवळ कायद्याची बाब नाही, तर मूलभूत जबाबदारीची आहे. विद्यार्थी जीवनात तणाव, छोटे-मोठे वाद आणि भावनिक असंतुलन सामान्य आहेत. मात्र, त्यांना वेळीच समुपदेशन उपलब्ध न झाल्याने छोटे वाद हिंसक रूप घेतात. विशेषतः आयटीआय आणि पॉलिटेक्निकसारख्या संस्थांमध्ये असे समुपदेशन केंद्रे दुर्मीळ आहेत. सोशल मीडियावर आरोपीने टाकलेला स्टेटस हा तरूणांच्या मानसिकतेचा धोकादायक कल दर्शवतो. हिंसाचाराला ‘शो’ म्हणून साजरा करण्याची विकृती वाढत आहे. यामुळे केवळ भीतीच पसरत नाही, तर इतर विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. 

पालक, शिक्षक आणि प्रशासनाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांना भावनिक नियंत्रण, संघर्ष सोडवणे आणि सोशल मीडिया जबाबदारीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या घटनेमुळे आंबेगाव परिसरात शोक आणि भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी, या प्रकरणातून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेच्या कमतरता, शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.